

‘महाभारत’ म्हणजे मूळचे ‘जय’. भारतीय उपमहाद्विपातील सर्वार्थाने देदीप्यमान असणाऱ्या या महाकाव्याचे कथन करीत असताना देवदत्त पट्टनायक महाभारताची अभिजात संस्कृत संहिता, त्यावर भारतातल्या प्रादेशिक लोकसाहित्यातून करण्यात आलेली भाष्ये, ज्यामध्ये छत्तीसगढमधल्या पांडवानीपासून महाराष्ट्रातल्या गोंधळ, तामिळनाडूतल्या तेरुकुट्टू ते कर्नाटकातल्या यक्षगानापर्यंत साऱ्यांचा आधार घेताना दिसतात.
महाभारताचे हे कथन इथे एकूण एकशे आठ प्रकरणांमध्ये विभागलेले तर आहेच पण त्यासह या कथनाला स्वतः लेखकाने विचारपूर्वक रेखाटलेल्या अंदाजे अडीचशे समृद्ध आणि नेत्रसुखद रेखाचित्रांची जोडही देण्यात आली आहे. या कथनात सर्वसामान्य वाचकाला क्वचितच ज्ञात असणाऱ्या महाकाव्यातील अनेक तपशिलांवर प्रकाशझोत टाकण्यात आलेला आहे. उदा. इथे शंभर कौरवांच्या नावांची यादी आहे. तामिळनाडूमध्ये एक देवता म्हणून द्रौपदीची जी आराधना केली जाते त्याविषयीची माहिती आहे. तसेच अस्तिक, माधवी, जैमिनी, इरावण आणि बार्बरिक यांचा कहाण्यांचा समावेश या कथनात केलेला आहे. मूळ महाभारतात शकुंतलेचे आख्यान कसे आले आहे; महाभारतातले रामायण काय म्हणते; हेही इथे आपण पाहू शकतो. केवळ एव्हढेच नव्हे तर, कुरुक्षेत्रावरील युद्धाचा नेमका कालावधी कोणता या प्रश्नांचे, तत्कालीन आकाशस्थ ग्रह आणि ताऱ्यांच्या अवस्थांचा अभ्यास करून दिले गेलेले उत्तरही आपणाला या कथनात दिसेल.